१५ ऑगस्टला मी सकाळी लवकर उठतो
तोंड धुवायच्या आधी म्यूसिक सिस्टमवर "मेरे देश कि धरती" मोठ्याने वाजवतो.
कमोडवर बसल्याबसल्या देशभक्तीचे SMS फोरवर्ड करतो.
आंघोळ करून पांढरा झाबा झळकवत झेंड्याला सलाम ठोकतो.
इमेल फोरवर्ड करून झाल्यावर
फेसबुकवर जयहिंद, वंदे मातरम लिहून स्टेटस अपडेट करतो.
इतकं करून समाधान होत नाही म्हणून ,
भारत , हिंदुस्तान , आय लव इंडिया अश्या पेजला विझिट देतो.
अण्णा आणि रामदेव बाबांच्या पेजवर कमेंटसुद्धा करतो.
पेपरात खून , चोरी , दरोडे , अत्याचार,भ्रष्टाचार
एकाच पानावर , मी दुर्लक्ष करतो,
चारा घोटाळा, टेलिकॉम घोटाळा,खाण घोटाळा, आदर्श घोटाळा
ह्या लोकांना कंटाळा कसा येत नाही ?
मग एखाद्या बातमीखाली कडक शब्दात प्रतिक्रिया नोंदवतो.
लायसेन्स नाही म्हणून पोलिसांनी अडवल्यावर मात्र
गांधीजीना पुढे करून गुपचूप सटकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा